भारतातील सर्वात उंच इमारतींची यादी
From Wikipedia, the free encyclopedia
ही भारतातील सर्वात उंच इमारतींची यादी आहे. यामध्ये किमान १९० मीटर (६२३ फूट) उंच इमारती आहेत. फक्त राहण्यायोग्य इमारतींना सूचीबद्ध केले जाते, ज्यामध्ये रेडिओ मास्ट आणि टॉवर, निरीक्षण मनोरे, मंदिरे, चिमणी आणि इतर उंच वास्तू संरचना वगळल्या जातात. [1]
भारतातील गगनचुंबी इमारतींच्या युगाची सुरुवात १९५९ मध्ये चेन्नईतील एलआयसी बिल्डिंग पूर्ण झाल्यापासून झाली. सुरुवातीला १२ मजली असलेली ही इमारत देशातील पहिली गगनचुंबी इमारत होती आणि १९६१ पर्यंत ती देशातील सर्वात उंच इमारत राहिली. नंतर मुंबईतील २५ मजली उषा किरण बिल्डिंगने तिला मागे टाकले. [2] तेव्हापासून देशातील विविध शहरांमध्ये अनेक उंच इमारती दिसू लागल्या. पॅलेस रॉयलने २०१८ मध्ये ३२० मीटर उंचीची देशातील सर्वात उंच इमारत म्हणून संरचनात्मकदृष्ट्या अव्वल स्थान पटकावले होते, परंतु इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू आहे. ३०१ मीटर (९८८ फूट) आणि ७८ मजले असलेली लोखंडवाला मिनर्व्हा ही देशातील सर्वात उंच पूर्ण झालेली इमारत आहे. [3]अनेक उंच इमारतींचे बांधकाम सुरू आहे, [4] आणि काही होल्डवर आहेत. [5] प्रत्येक शहरातील सर्वात उंच इमारती अनुक्रमे :
- मुंबई: पॅलेस रॉयल
- कोलकाता: द ४२ (द 42)
- नोएडा: सुपरनोव्हा स्पिरा
- गुरुग्राम: ट्रम्प टॉवर्स दिल्ली एनसीआर टॉवर्स
- चेन्नई: एसपीआर सिटी टॉवर एच
- हैदराबाद: लोढा बेलेझा
- पुणे: अमनोरा गेटवे टॉवर्स
- नवी मुंबई : महाजन हॉस्पिटल
- बेंगळुरू: CNTC प्रेसिडेंशियल टॉवर
भारतातील सर्वाधिक गगनचुंबी इमारती आणि उंच इमारती मुंबईत आहेत; तेथे २०० पेक्षा जास्त गगनचुंबी इमारती आहेत. [6] तसेच [7] [8] [9] मुंबई महानगर प्रदेशात सध्या ५,६०० उंच इमारती आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या २० वर्षांत सुमारे १८ गगनचुंबी इमारती [10] [11] आणि ५,२०० [12] [13] [14] [15] [16] [17] उंच इमारती आहेत. कोलकातामध्ये १४:विद्यमान गगनचुंबी इमारती आहेत [18] आणि सुमारे ८०० [19] पूर्ण झालेल्या उंच इमारती आहेत. बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, पुणे, सुरत आणि कोची येथेही अनेक उंच इमारती आहेत.