आगरी बोलीभाषा
From Wikipedia, the free encyclopedia
आगरी ही आगरातले आगरी, गवळी, कुणबी शेतकऱ्यांची, खारवी, भोई यांची बोलीभाषा आहे.
आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. जसे आगर पिकविणारा तो आगरी. मुळात आगर म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई आणि रायगड, रत्नागिरी ह्या जिल्हयांचा प्रदेश आहे. जसे दक्षिण कोकणाला 'तळ कोकण' म्हणतात तसेच उत्तर कोकणाला आगर (अपरांत) म्हणतात. या आगरातील मूळ भूमिपुत्र म्हणजेच आगरी, गवळी, कुणबी, कराडी, वाडवळ, कुपारी, कुंभार ह्या शेतकरी व कोळी, खारवी, भोई, भंडारी ह्या दर्यावर्दी जातींचा समूह म्हणजे आगरी समाज.