ए.पी.जे. अब्दुल कलाम
भारतातील शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती / From Wikipedia, the free encyclopedia
अवुल पाकीर जैनुलाब्दिन तथा ए.पी.जे अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर १९३१ - २७ जुलै २०१५) हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.
ए.पी.जे. अब्दुल कलाम | |
---|---|
२००२ मधील चित्र | |
११वे भारतीय राष्ट्रपती | |
कार्यालयात २५ जुलै २००२ – २५ जुलै २००७ | |
Prime Minister |
अटलबिहारी वाजपेयी मनमोहन सिंग |
Vice President |
किशन कांत भैरोसिंह शेखावत |
मागील | के.आर. नारायणन |
पुढील | प्रतिभा पाटील |
१ले मुख्य वैज्ञानिक सल्लागार, भारत सरकार | |
कार्यालयात १९९९ – २००२ | |
President | के.आर. नारायणन |
Prime Minister | अटलबिहारी वाजपेयी |
मागील | पदनिर्मिती |
पुढील | राजगोपाल चिदंबरम |
वैयक्तिक माहिती | |
जन्म |
अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम १५ ऑक्टोबर १९३१ (1931-10-15) रामेश्वरम, मद्रास, ब्रिटिश भारत (आजचे तमिळनाडू, भारत) |
मृत्यू |
२७ जुलै, २०१५ (वय ८३) शिलाँग, मेघालय, भारत |
चिरविश्रांतीस्थान | डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम देशीय निनायवगम, पेई करुंबू, रामेश्वरम, तामिळनाडू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
इतर राजकीय पक्ष | राष्ट्रीय लोकशाही आघाडी |
शिक्षणसंस्था |
|
Profession |
|
पूर्ण यादी | |
Notable work(s) |
|
Signature | |
Website | Official Website |
भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. अशा प्रकारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. १९९८मध्ये भारताच्या पोखरण-II अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली. १९७४मध्ये भारताने केलेल्या मूळ अणुचाचणीनंतर ही पहिलीच चाचणी होती.
कलाम यांची २००२मध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि तत्कालीन विरोधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याने भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यांना "पीपल्स प्रेसिडेंट" (जनतेचे राष्ट्रपती) म्हणून व्यापकपणे संबोधले जाते.[1] राष्ट्रपतीपदानंतर कलाम हे शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात परतले. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्नसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते प्राप्तकर्ते होते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे व्याख्यान देत असताना कलाम कोसळले आणि २७ जुलै २०१५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[2] राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांसह हजारो लोक त्यांच्या गावी रामेश्वरम येथे आयोजित अंत्यसंस्कार समारंभास उपस्थित होते, जिथे त्यांना पूर्ण राज्य सन्मानाने दफन करण्यात आले.[3]