छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्र राज्यातील शहर / From Wikipedia, the free encyclopedia
छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. या शहराला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुद्धा येथे आहे. हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.[2] फेब्रुवारी २०२३ मध्ये भारत सरकारने शहराचे नाव "औरंगाबाद" बदलून "छत्रपती संभाजीनगर" असे केले.[3]
हा लेख छत्रपती संभाजीनगर शहराविषयी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
जलद तथ्य
?छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: ५२ दारांचे शहर | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १३८.५ चौ. किमी |
जवळचे शहर | अहमदनगर, जालना |
जिल्हा | छत्रपती संभाजीनगर |
लोकसंख्या • घनता |
१६,५०,०००[1] (२०११) • ११,९१३/किमी२ |
भाषा | मराठी |
महापौर | नंदकुमार घोडेले |
महानगरपालिका आयुक्त | जी. श्रीकांत |
पोलीस आयुक्त | मनोज लोहिया |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 431001 • +०२४० • MH-20 |
संकेतस्थळ: छत्रपती संभाजीनगर महापालिका संकेतस्थळ |
बंद करा