हिंगोली जिल्हा
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा. / From Wikipedia, the free encyclopedia
हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोलीच्या उत्तरेस वाशिम जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. त्या दिवशी औंढा नागनाथ, वसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला.
हिंगोली जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | औरंगाबाद विभाग |
मुख्यालय | हिंगोली |
तालुके | औंढा नागनाथ•सेनगांव•कळमनुरी•वसमत• हिंगोली |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ४,५२७ चौरस किमी (१,७४८ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ११,७८,९७३ (२०११) |
-लोकसंख्या घनता | २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल) |
-शहरी लोकसंख्या | १,७८,७३३ |
-साक्षरता दर | ७६.०४% |
-लिंग गुणोत्तर | ९४२ ♂/♀ |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | श्री. जितेंद्र पापळकर |
-लोकसभा मतदारसंघ | हिंगोली (लोकसभा मतदारसंघ) |
-विधानसभा मतदारसंघ | हिंगोली,वसमत, कळमनुरी |
-खासदार | हेमंत पाटील |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ९० मिलीमीटर (३.५ इंच) |
प्रमुख_शहरे | हिंगोली, वसमत, कळमनुरी |
संकेतस्थळ |
हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ चौरस कि.मी.२ आहे. एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे. जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत. ज्वारी व कापूस ही जिल्ह्याची मुख्य पिके आहेत.
वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील गोरक्षनाथ महाराजांचे देवस्थान आहे. येथे पौष पौर्णिमेला यात्रा सुरू होते. खुप ठिकणांवरून येथे भाविक येतात. कुरुंदा गावाजवळील टोकाई माता मंदिर,आंबा येथील अंबादेवी मंदिर, करंजाळा गावातील सीमा भागात बाराशिव येथील हनुमान मंदिर व जुनी बाराव आहे यात पंचमुखी महादेव अर्ध मुर्ती आहे मिती माघ शुक्ल पौर्णिमेला यात्रा भरते येते बारा गावांच्या शिव एकत्रित येतात व औंढा नागनाथ व वसमत सीमेवरील मंदिर आहे, बोराळा येथील हनुमान मंदिर व चोंडी बहिरोबा येथील बहीरोबा देवस्थान इ.
वारंगा मसाई हे गाव हिंगोली पासुन १९ किलोमीटर अंतरावर आहे. आणि तालुका कळमनुरी पासून १० किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव मसाई माता मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या गावांमध्ये पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी एक मोठी यात्रा भरते. हे गाव तिन्ही बाजूंनी डोंगरांनी घेरलेले आहे.
वारंगा मसाई गावातील मंदिरे
मसाई देवी मंदिर, हनुमान मंदिर, संत सावता माळी मंदिर, डागेश्वर महादेव मंदिर, गणेश मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर, खंडोबा मंदिर.