धाराशिव जिल्हा
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा. / From Wikipedia, the free encyclopedia
धाराशिव जिल्हा (पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा) हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एक जिल्हा आहे. हैदराबादचे ७ वे निजाम मीर उस्मान अली खानच्या काळात शहराला उस्मानाबाद हे नाव देण्यात आले होते. मात्र फेब्रुवारी २०२३ मध्ये या शहराचे व जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकरच्या वतीने घेण्यात आला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्या गेले. पुढील सुनावणी होई पर्यंत, म्हणजे १० जून २०२३ पर्यंत जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. मात्र शहराचे नाव धाराशिव कायम आहे.[1] यांचे जिल्हा मुख्यालय धाराशिव शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ किमी२ भाग हा शहरी आहे.
हा लेख धाराशिव जिल्ह्याविषयी आहे. धाराशिव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
जलद तथ्य
धाराशिव जिल्हा Dharashiv | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | छत्रपती संभाजीनगर विभाग |
मुख्यालय | धाराशिव |
तालुके | धाराशिव • तुळजापूर • उमरगा • लोहारा • कळंब • भूम • वाशी • परांडा |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ७,५६९ चौरस किमी (२,९२२ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | १६,६०,३११ (२०११) |
-लोकसंख्या घनता | २२१ प्रति चौरस किमी (५७० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ७६.३३% |
-लिंग गुणोत्तर | १.०८ ♂/♀ |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | सचिन ओम्बासे |
-लोकसभा मतदारसंघ | धाराशिव लोकसभा मतदारसंघ |
-विधानसभा मतदारसंघ | उमरगा विधानसभा मतदारसंघ • धाराशिव विधानसभा मतदारसंघ • तुळजापूर विधानसभा मतदारसंघ • परांडा विधानसभा मतदारसंघ |
-खासदार | ओमप्रकाश राजेनिंबाळकर |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ६०० मिलीमीटर (२४ इंच) |
संकेतस्थळ |
बंद करा